Originally posted by: revatiraj
तसे तर माणसे हजारो वर्षापांसून स्त्रियांना फसवत आलेले आहेत. पण मला वाटते हि घटना त्या काळात घडली म्हणून वर्क झाली. ८० आणि ९०मध्ये जग खूपच सिम्पल होते. लोक पटकन विश्वास ठेवायचे. काही व्यवहार तर फक्त प्रॉमिस वर चालायचे. चांगली नोकरी आणि थोडे गोड बोलणे यात स्वाती अगदी सहज अडकली. सध्या असे फसवणे एवढे सोपे नाही, आता मुलींकडूनच फसले जाण्याची शक्यता जास्ती आहे. 😆
खर आहे.
पण मुळात ऑलमोस्ट सगळ्या मालिकांमध्ये सरळ ,साध्या,गरीब ,भोळसट मुली या फक्त चाळीतच रहातात,आणि एरवी स्मार्टनेस
दाखवून पाहिजे तिथे सहज फसवल्या जातात किंवा अचानक कुटुंबाचा कळवळा येऊन नको ते करायला जातात,हे चित्र जे दाखवल जात त्याचाच राग येतो.संकट यांच्यावरच येतात,श्रीमंत मुल यांच्याच प्रेमात पडतात,घराची जबाबदारी याच मुली घेतात,सगळे संस्कार यांनाच माहिती असतात.
जस काही ब्लॉकमध्ये किंवा त्यातल्या त्यात सुस्थितीत असलेल्या मुली यांना त्यांच्या आईवडिलांनी वार्यावरच सोडलेल असत.
त्या गरीब ,भोळ्या नसतातच.जबाबदार नसतात,संस्कारी नसतात.
हे चित्र पहिल बदलल पाहिजे.
कितीतरी सुशिक्षित, सधन कुटुंबातील मुलीही फसवल्या गेल्याची उदाहरण आहेत.
पण यांना मालिकेतली हिरोईन गरीबच लागते.
म्हणूनच अग्गबाईमध्ये जरा शुभ्राच कँरेक्टर या सो कॉल्ड परंपरेला छेद देत आहे अस कळल्यावर लगेच तिच कँरेक्टर पूर्णपणे स्पंईल केल.
या मालिकेत सुध्दा ही स्वाती दिवाळीच्या दिवशी मुलांना मनाच्या श्लोकांच पुस्तक देते,म्हणजे किती ग बाई ही गुणांची,कसे संस्कार करते मुलांवर,हे सिध्द होत का.
कधी यातून बाहेर येणार हे मालिकावाले यातून काय माहित.
766